निर्मिती वास्तुशात्राची
मानव जातीत तीन प्रकारचे दुःख आहेत
१) दैहिक दुःख ( शारीरिक दुःख)
२) दैविक दुःख ( अचानक संकट)
३) अध्यात्मिक दुःख ( कसलेच समाधान नाही)
वास्तुशास्त्रात ह्याचे समाधान आहे. जसे जसे मानव प्रगती करत गेला तसे त्याला दैविक दुःख होत गेले. अचानक त्याच्यासमोर संकटं येत गेली. आणि म्हणून देवाने ज्योतिष शास्त्राची निर्मिती केली.
नंतर मानवाला प्रगती करता करता शारीरिक आजार होत गेले तशी देवाने आयुर्वेदाची स्थापना केली.
हेही वाचा :- वास्तू मधील १६ दिशा आणि त्याच्या डीग्रीज
आणि हे सर्व तो जिथे राहतो त्यात त्याला समाधानाचं मिळत नाही आणि त्याला अध्यात्मिक दुःख येत राहते म्हणून त्याने वास्तुशास्त्राची निर्मिती केली.
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद
या चार वेदांचे खालील प्रमाणे उपवेद आहेत.
- ऋग्वेद – आयुर्वेद
- यजुर्वेद – धनुर्वेद
- सामवेद – गंधर्ववेद
- अथर्ववेद – स्थापत्यवेद
स्थापत्यवेद म्हणजेच वास्तूचे ज्ञान आणि तेथून वास्तुशास्त्राची उत्पत्ती झाली
सत्युगात वास्तुशास्त्र नव्हते त्रेतायुगात वास्तुशास्त्राची निर्मिती झाली. त्रेतायुगात शिवाच्या श्रमबिंदूने अंधकारसुराची उत्पत्ती झाली आणि त्याच्याबरोबर शिवाचे युद्ध झाले. आणि पुढे वास्तुशास्त्र कसे निर्माण झाले ह्या युद्धाचा अंत कसा झाला हे खालील लिंक वर क्लिक करून त्याची माहिती घ्या.
धन्यवाद…..!