
जन्मकुंडलीत वरील कुंडली प्रमाणे रवी जर ७ नंबर च्या तुला राशीत १२ व्या स्थानी, ६ व्या स्थानी, किंवा ८ व्या स्थानी लिहिला असेल तर मागच्या जन्मी एकतर असा मनुष्य पाप करून ह्या जन्मी काही पेंडिंग कर्म फेडण्यासाठी आलेला आहे असे समजावे.
वरील कुंडलीत जिथे जिथे रवी लिहिला आहे ते कुंडलीचे द्वादश, षष्ठ, आणि अष्टम स्थान आहे.
असा योग फक्त ज्यांचा जन्म १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर मध्ये कोणत्याही वर्षी झाला आहे त्यांच्याच पत्रिकेत येऊ शकेल. कारण ह्या ३० दिवसात सूर्य हा तुला राशीत नीच असतो.
किंवा
कोणत्याही जन्मकुंडलीत ४ पेक्षा जास्त ग्रह नीच राशीत पत्रिकेच्या कोणत्याही स्थानी असतील तर असा जातक मागील जन्मात आत्महत्या करून काही पेंडिंग कर्म ह्या जन्मी फेडण्यासाठी आलेला असेल.
त्यासाठी नीच राशीतील ग्रह खालील प्रमाणे असतील
चंद्र ८ बरोबर लिहिला असेल
मंगल ४ बरोबर लिहिला असेल, बुध -१२ , गुरु – १०, शुक्र – ६, शनी – १ , राहू – ९ आणि केतू – ३ ह्या अंकाबरोबर पत्रिकेत लिहिले असतील .
(ह्यात ४ किंवा त्या पेक्षा जास्त ग्रह असे असणे आवश्यक आहे)
उपाय
वरील दोन्हीही अवस्था जर पत्रिकेत दिसत असतील आणि ह्या जन्मी बराच त्रास होत असेल तर तीर्थयात्रा करणे , माता पित्याची सेवा करणे, गौ सेवा करणे हे उत्तम असेल.
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७८
७५०६७३७१९