You are currently viewing बलिप्रतिपदा – दीपावली पाडवा – भाऊबीज – यमव्दितीया – विक्रम संवत्सर २०७७ : सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२०

बलिप्रतिपदा

बलिप्रतिपदा- असुरांचा राजा बलि हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, राजा म्हणून बलिराजाची ओळख होती‌.बलि राजा हा फार दानशूर होता. त्यामुळे त्याचे पुण्य वाढून तो अधिक ताकदवान झाला. पृथ्वीवर देवांपेक्षा त्याचे जास्त महत्व वाढू लागले.

ह्याच धीरामुळे त्याने स्वर्गावर अधिपत्य मिळविण्यासाठी यज्ञाचे आयोजन केले. इंद्रासहित सर्व देवगण भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी हा यज्ञ पूर्ण न होण्यासाठी काही तरी करा अशी प्रार्थना केली.

तेव्हा विष्णूंनी एका लहान भिक्षुक ब्राह्मण बालकाचे स्वरूप घेतले हाच तो वामन अवतार आणि जिथे बलि राजाचा यज्ञ सुरु होता तेथे वामन अवतारात प्रकट झाले. बलि राजा हा खूप दानी आहे हे ते जाणून होते म्हणून त्यांनी बलि राजाकडे ३ पावले भूमी मला दे मग यज्ञाला सुरुवात कर.

तेथे शुक्राचार्य सुद्धा होते त्यांनी बलि राजाला सावध सुद्धा केले तरी बलि राजा म्हणाला कि जर स्वतः विष्णू जरी माझ्या दारी आले तरी मी त्याना माघारी पाठवू शकत नाही असे म्हणून त्यांनी वामनाला ३ पावले जमीन देण्याचे मान्य केले.

लागलीच वामनरूपी विष्णूंनी विराट रूप धारण केले त्यांच्या एका पावलात स्वर्ग आणि आकाशमंडळ सामावून गेला दुसरे पाऊल पृथ्वीवर ठेवले आणि आता तिसरे पाऊल ठेवण्यास त्यांना जागा नव्हती म्हणून त्यांनी बलि ला विचारले कि तिसऱ्या पावलांसाठी मला जागा दे लागलीच बलि राजा म्हणाले कि भगवंत हे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा.

मग तसेच त्यांनी तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवला आणि बलि राजाचा अंत झाला. त्या आधी बलि राजाने विष्णूकडे पृथ्वीवरील तीन दिवस मागून घेतले ज्यात प्रत्येक वर्षी त्याच्या ह्या त्यागाची लोक आठवण करतात. तेव्हापासून बलिप्रतिपदा हा उत्सव बलि राजाला समर्पित आहे.

बलिप्रतिपदा मुहूर्त

ह्यावर्षी प्रतिपदा हि रविवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२० सकाळी १०:३९ पासून सुरु होत आहे. आणि १६ नोव्हेंबर सकाळी ७:०९ पर्यंत असेल.

सूर्योदय ६:४५ ला आहे त्यामुळे बलिप्रतिपदा हा उत्सव दिनांक १६ नोव्हेंबर लाच असेल. नंतर ७:०९ नंतर व्दितीया सुरु होईल.

व्दितीया हि १७ नोव्हेंबर च्या पहाटे ३:५९ पर्यंत असल्याने नंतरचा १७ चा सूर्योदय मिळत नसल्याने भाऊबीज सुद्धा १६ नोव्हेंबर लाच आहे.

बलिप्रतिपदेच्या दिवशी काय करावे

‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी हा दिवस खास असतो आपल्या नवीन वह्यांची सुरुवात ह्या दिवशी सुद्धा केली जाते. नवीन जागेचे दुकानाचे उदघाटन ह्या दिवशी शुभ मानले जाते.

दीपावली पाडवा

बलिप्रतिपदा ह्या दिवशी घरोघरी पत्नी पतीला ओवाळणी करण्याची पद्धती आहे. त्यासाठी पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून पतीला बसवून पत्नी पतीची ओवाळणी करते त्याबदल्यात पती पत्नीला आपल्या ऐपतीप्रमाणे काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. (मात्र जास्त हट्ट करू नये).
नवविवाहित जोडपी पहिली दिवाळी आपल्या माहेरी साजरी करतात. त्यात जावयाला तेथे आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. (मात्र जास्त हट्ट करू नये).

हेही वाचा : गोवर्धन पूजा रविवार १५ नोव्हेंबर २०२०

https://shreedattagurujyotish.com/govardhan-puja-sunday-15-november-2020/

भाऊबीज

हिंदू धर्मात भाऊबीज चे फार महत्व आहे. ह्या पर्वाला यमद्वितीया / भ्रातृ द्वितीय सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी बहिणीकडून कपाळी विजय तिलक + ओवाळणी करून घेतो बहीण भावाला गोडधोड जेवायला घालते.

बहीण आपल्या भावाची ओवाळणी करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते तो पराक्रमी होऊन त्याच्या करिअर मध्ये खूप प्रगती व्हावी म्हणून सुद्धा हि प्रार्थना बहिणीकडून केली जाते नंतर भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतात.

का मानवली जाते भाऊबीज यमद्वितीयेला

पुराणाच्या संदर्भानुसार सूर्याच्या पत्नीचे नाव छाया होते तिला यमुना आणि यमराज अशी दोन मुलं.
यमुना हि आपल्या यम भावाला खूप प्रेम करत होती. प्रत्येक वेळी त्याला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण ती देत असे पण अतिव्यस्ततेमुळे यम नेहमी हे टाळत असे शेवटी कार्तिक शुक्ल द्वितीयेला यमुनाने यमाकडून तसे वचनच घेतले. आणि त्याला जेवणाचे आमंत्रण दिले.

यमराज नेहमी विचार करत असे कि मी मृत्यूची देवता असून मला कोण आपल्या घरी जेवायला बोलावेल आणि जर माझी बहीण मला बोलावते आहे तिच्या घरी तर मला माझ्या धर्माचे पालन म्हणून तिच्या घरी ह्या वेळी जायलाच पाहिजे. असे म्हणून यमराज द्वितीयेला तिच्या घरी गेला. बहिणीच्या घरी निघताना त्याने नरकातून कित्येक जीव मुक्त केले अशी सुद्धा आख्यायिका आहे.

बहिणीने त्यास अंघोळीला पाणी दिले त्याला समोर बसवून तिलक केला आणि जेवायला सुद्धा घातले. यमराज ह्यावर प्रसन्न होऊन बहिणीला वर मागायला सांगितला . बहिणीने लगेच आपल्या भावाकडून असा वर मागून घेतला कि तू प्रत्येक वर्षी ह्या दिवशी माझ्या घरी येत जा.

जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ह्या दिवशी ओवाळणी +जेवायला जाईल त्याला तुझ्यातर्फे मृत्यूचे आणि नरकाचे भय नसावे. हे ऐकून यमाने सुद्धा असेच मी करेन ह्याचे वाचन दिले आणि तेव्हापासून भाऊबीज सण साजरा करण्याची आणि यमुना नदीच्या पूजनाचे ह्या दिवशी महत्व आहे.

भाऊबीज ओवाळणी मुहूर्त

दुपारी १:३१ ते ३:४५

विक्रम संवत्सर २०७७

गुजराथी नववर्ष दिवाळीत बलिप्रतिपदा ह्या दिवसापासून सुरु होते.

धन्यवाद…..!

Leave a Reply